माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो....पण.....,
माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही....
म्हणून आयुष्यात चुका करा....पण....
कुणाचा विश्वास कधीही तोडू नका...
विश्वासानेच बनतात नाती
विश्वासानेच टिकतात नाती
विश्वासाचेच बंध सगळे
विश्वासानेच सारे ऋणानुबंध जुळती..
काही नाती अशी असतात कि ती दोन जन्म
सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात,
आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत
दोन जन्म पुरेल इतके प्रेम देउन जातात...
तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला,
तरी त्यात तडा तसाच राहतोच.....
तशीच आपली नाती असतात,
एकदा तुटली की,
पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो.....
म्हणून आयुष्यात जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा.....
कारण शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच..