जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात
,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात
,
काही साथ देण्याची हमी देऊन
,
गर्दीत हरवून जातात........
नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार :(
जीवन फक्त जगायचे असते ....
त्यातून कही तरी शिकायचे असते....
शिकता शिकता इतराना ही मदत करायची असते....
जीवन जगताना आठवणी चा आधार घ्यायचा असतो ....
त्यातूनच अनुभव घडवायच असतो ...
जीवन म्हणजे उन सावली चा खेळ असतो...
आज बालपण तर उद्या तारुण्य अणि परवा म्हातारपण ...
असे हे जीवन चालतच राहते, ते न थांबते ना थांबवते..
जीवन हे असेच सुख: दुख: च्या काटेरी फुलात गुंतलेले असते ....
त्यातूनच मार्ग काढत जगायचे असते ....
जीवनात प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात,
अनेक चढ़ उतार असतात.., अनेक मार्ग सुद्धा असतात.......
यातूनच योग्य मार्ग काढून जगणे हेच खरे जीवन असते ...
म्हणूनच जीवन फक्त हसत खेळत जगायचे असते....!!
आयुष कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष जगण्याची कारण
बदलतात....
जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते.
पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण
म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम
करण्यासाठी शक्ती पाहिजे विचार ही एक विलक्षण शक्ति असून,
तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे,...म्हणून
विचार बदला,..म्हणजे नशीब बदलेल...
माणसाचे आयुष्य फक्त दोनवेळा बदलते...
१. जेव्हा कुणीतरी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते
२. जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते...