आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते - ''बाबा''
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - ''आई''
चट्का बसला, ठेच लगली,
फटका बसला तर
"आई ग...!"
हा शब्द बाहेर पडतो,
पण
रस्ता पार
करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक
दाबतो तेव्हा
"बाप रे!"
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई
चालते
पण
मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
प्रिय बाबा, आठवतंय मला,
तुम्ही बोट धरून चालायचं शिकवलेलं,
माझं पहिलं पाऊल धडपडलेलं
तुमच्या काळजाचा ठोका चुकवलेलं,
तुमच प्रेम नेहमीच मिळवलेलं
प्रिय बाबा, आठवतंय मला,
तुम्ही मला लाडाने पिल्लू म्हणलेलं,
आईला देखील दोन शब्द बोललेलं,
लाडाने जवळ घेऊन अ, आ, ई, गिरवलेलं,
खाऊ शिवाय कधी बाहेर न जाऊ दिलेलं,
प्रिय बाबा, आठवतंय मला,
शिक्षणासाठी सर्वस्व डावावर लावलेलं,
कष्टाने मिळेल तेच मिळवलेलं,
तुमच्या संस्कारांनी आयुष्य घडलेलं,
आजही आयुष्य तुमची उणीव भासलेलं,
प्रिय बाबा, आठवतंय मला,