दिवस सरत जाणार पण,
तुझी आठवण नाही सरणार..
एक आठवण गेली तरी,
तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार..
तुला विसरण्याचा मी,
उगाचं एक खोटा प्रयत्न करणार..
आणि जगण्याची इच्छा नसतानाही,
तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार..
"एकदा एके ठिकाणी प्रेमविवाह चालू होता, विवाहाची वेळ सकाळची असल्याने वातावरण एकदम प्रसन्न होते, भरपूर गर्दी झाली होती ... खास करून अनेक प्रियकर आणि प्रेयसींची !! ;)...
तेवढ्यात तिथे एक मुलगा त्याच्या मित्रा बरोबर आला,
आल्याबरोबर तो म्हणाला , " कित्ती अंधार आहे इथे" !!
त्याचा मित्र :- अरे चांगला लक्ख प्रकाश पडला आहे आणि अंधार काय म्हणतोस ?
तो मुलगा :- "माझ्या म्हणण्याचा अर्थ अंधार म्हणजे, प्रकाशाची गैरहजेरी नसून .. "तिची गैरहजेरी" हा होय :( !!!
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते...,
फरक एवढाच आहे की...??
झरे वाहतात....
तळ्यांच्या साठवणीत.....
आणि.....,
डोळे वाहतात....
कुणाच्या तरी आठवणीत....
माझ्या स्मित हास्याने,
होई मन तुझे दिवाने,
नेहमीच गात असतो तू,
आपल्या प्रीतीचे तराणे,
मी तुझीच रे साजणा,
आयुष्यभर आता आहे,
"फक्त तुझ्या प्रेमासाठीच"
माझे जगणे अन मरणे....
बघायला गेले तर एकटेपण किती अजाणते..
गर्दीत किती तरी चालत असतात एकटे..
काही नसेल माहिती तर सगळ्यांना सामान्य वाटते..
पण मनाच्या भिंतीवर त्यांच्या ती फ्रेम रिकामीच असते..
जिथून आणि जेथे एकटेपण उपजते उदयास येते..