आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील.........
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
आयुष्यात एकदाच तुझ्यावर प्रेम केले पण नशिबानं साथ दिली नाही.वाटा जरी संपल्या तरी दिशा बाकी आहेत.प्रेम संपलं तरी आठवणी ताज्या आहेत.
विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????
वारा कसा मंद मंद वाहतो...
मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????
सरी कशा थेंब थेंब बरसतात...
मनाला कशा चिंब चिंब भिजवतात...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????
मोगरा ही गंध गंधित होतो...
मनाला ही धुंद मोहरून नेतो ...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????
अश्रु ही कसे झर झर झरतात...
तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
स्पंदनंचा ताल ताल हरवतो
प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो
तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
माझे शब्द नी शब्द विखुरतात
माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात
तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
आठवणी या अश्या का असतात... ,
ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या... ,
नकळत ओंजळ रिकामी होते... ,
मग उरतो तो फक्त ओलावा प्रत्येक आठवणीचा...!!!