आपण एक पेन्सील बनुन कोणाचे सुख नाही लिहू शकत... पण एक चांगला रबर बनुन नक्कीच दुसर्यांचे थोडे का होईना दु:ख दुर करू शकतो...!!
जात्याचा खालचा दगड स्थिर असतो.
वरचा दगड फिरणारा असतो.
दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते.
आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा.
मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला
तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होते.
आपला दिवस आनंदात जावो.
*कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका....!!!*
*वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत....!!!*
*मी विसरलो नाही कुणाला....!!!*
*माझे खुप छान मित्र आहेत जगात..!!!*
*फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात...!!*
मलाही एकदा शाळेत जायचंय "
उभं राहून, हातजोडून
“वंदेमातरम” गायचंय
मलाही एकदा शाळेत जायचंय
पाण्याची बाटली, खाऊचा डबा
पाठीला दप्तर न्यायचंय
मलाही एकदा शाळेत जायचंय
आंबट कैरी, हिरवी बडीशेप
मीठातली चिंचा बोरं खायचंय
मलाही एकदा शाळेत जायचंय
बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार
पाढे म्हणत मोठं व्हायचंय
मलाही एकदा शाळेत जायचंय
हाताला माती, अंगाला घाम
मधल्या सुट्टीत मैदानात खेळायचंय
मलाही एकदा शाळेत जायचंय
बंड्या बंटी, पिंकू पिंकी
सा-यांनी मिळून दंगा करायचंय
मलाही एकदा शाळेत जायचंय
नशीब"कोणी दुसरं लिहित
नसतं,
आपल नशीब आपल्याच
हाती असतं,
येताना काही आणायच नसतं,
जाताना काही न्यायचं
नसतं,
मग हे"आयुष्य"
तरी कोणासाठी जगायचं
असतं,
याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी"जन्माला"
यायचं असतं.......